हृषीकेशची कथेवर असलेली पकड कधीही सैलावत नाही. त्याच्या कथा चिरेबंद बंदिशीच्या असतात!
‘घनगर्द’मधून हृषीकेशच्या कथेनं एक उंबरठा ओलांडला आहे. ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे. भय आणि अद्भुताचा मार्ग तिने सोडलेला नाही. मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत. त्या नेमक्या कुठे जाणार हे कुणीही सांगू शकणार नाही. पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्त्वाचं.......